(अनिलकुमार पालीवाल)
तालुक्याचे खरीपाच्या प्रमुख पिकात असलेले मका व कापूस यासह सर्वच पिकांचे नुकसान झाल्याने संपूर्ण खरिप हंगाम वाया गेला असून रब्बी पीक उत्पादनासाठी केंद व राज्य शासनाने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून पुढील हंगामासाठी भरीव मदत करावी, अशी मागणी केली आहे.
तालुक्यात ऐन पिक वाढीच्या काळात ३० जुलै ते १४ऑगस्ट २०२५ या १५दिवसाचा पावसाचा खंड पडला, त्या संपूर्ण कालखंडात साऱ्या पिकाची वाढ खुंटली, मका चे बाबत त्या काळात दोन फुटाचे असताना निसवनी झाली त्यामुळे उतारा कमी, नंतरचे काळात
काही गावात अतिवृष्टी झाली पण तेथे पाऊस मोजण्याचे पर्जन्यमापक देखील नाहीत. त्यामुळे कागदावर अतिवृष्टी दिसत नाही,चहार्डी मंडळात एकदा, तर हातेड व लासूर मंडळात २४ तासात अतिवृष्टी इतका पाऊस झाला. परंतु ती दोन दिवसात दिसत असल्याने आपला कायदा ग्राह्य कसा धरणार?त्यामुळे झालेले नुकसान कसे मोजावे?उर्वरित काळात मात्र सतत आठ दिवस कमी अधिक प्रमाणात का असेना परंतु सतत पाऊस पडल्याने कापसाचे झाडे मेली. त्या काळात कापसाची बोंड उलवले पाहिजे ते पावसाने काळवंडले व ऊन नसल्याने कवडी झाली तो कापूस आज ₹४५००/- ते ₹५०००/- चे भावाने द्यावा लागत आहे.
दुर्दैवाने तालुक्याची पावसाची सरासरी देखील फक्त ७०%च आहे.
सरकारने ड्रोन ने सर्व्हे केला तर सारे हिरवेगार दिसेल ,पण उत्पादन मात्र २०%देखील नाही.
यासाठी सरकारने प्रत्यक्ष नुकसान असल्याने चोपडा तालुक्यात दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई मंजूर करावी व कर्जमाफी जाहीर करावी,अशी विनंती मुख्यमंत्री , महाराष्ट्र यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी देखील प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली असल्याने एकत्रित अहवाल आजच दुपारी मा. मुख्यमंत्री महोदयांना सादर करण्यात येईल असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.
निवेदनावर एस बी पाटील(गणपूर)अजित पाटील(कठोरा),प्रशांत पाटील(चहार्डी),रमेश सोनवणे(हातेड खुर्द),डॉ रवींद्र निकम(माचला),डॉ सुभाष देसाई(चोपडा),कुलदीप पाटील(विरवाडे), ॲड हेमचंद्र पाटील(पंचकचंद्रकांत पाटील(गणपूर), मधुकर बाविस्कर (हिंगोणा)
देविदास साळुंखे(चोपडा) युवराज पाटील (गणपूर),विश्राम धनगर,(चौगाव)कांतीलाल पाटील
(आखतवाडे),हरिश्चंद्र देशमुख(अडावद), धनंजय पाटील (घुमावल)गुणवंत वाघ(लासूर), दिनेश सोनवणे(हातेड बु),रामचंद्र बारेला (देवझिरी),सुभाष पाटील (पंचक),निलेश पाटील(पंचक),अजय पाटील (रुखणखेडा) यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


