• Sat. Jul 5th, 2025

नरसाळ्यात जपली जातेय श्रीकृष्ण जन्माष्टमीसह पालखीची परंपरा

देशपांडे परिवाराकडून मिरवणूक उत्साहात; गावातील भजन मंडळांचा सक्रिय सहभाग

मारेगाव (सचिन काकडे/तालुका प्रतिनिधी) तालुक्यातील नरसाळा या गावात श्रीकृष्ण जन्माष्टमी व पालखीची मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या पालखीचा पूर्वीपासून देशपांडे परिवाराकडे आहे. यावर्षीही सर्व देशपांडे परिवाराने एकत्र येऊन श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली.

जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. या वेळी गावातील महिला पुरुषांनी पालखीच्या दर्शनाचा लाभ घेतला. तसेच या मिरवणुकीत अनेक भजन मंडळांनीही सहभाग घेतला. याप्रसंगी देशपांडे परिवारातील डॉ. मोहनराव देशपांडे, रवीजी देशपांडे, रामदासजी देशपांडे, अनंतरावजी देशपांडे, नारायणजी देशपांडे व इतर सर्व देशपांडे परिवारासह गावकऱ्यांनी मिळून हा उत्सव आनंदाने साजरा केला.

…असा आहे गावाचा इतिहास
मारेगाव तालुक्यातील नरसाळा हे गाव तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे. पूर्वी अठरा साधूचे गाव म्हणून या गावाची ओळख आहेत. या गावाचे गंगासागर नाटक खूप लांब गावाला गेल्यामुळे या गावांची प्रसिद्धी झाली आहे. या गावात सुंदरकाड रामायण, वारकरी भजन मंडळ, तुकडोजी भजन मंडळ, गोंडी भजन मंडळ असून दरवर्षी भागवत सप्ताह होत असल्याने हे गाव धार्मिक गाव म्हणून ओळखले जाते.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.