• Sat. Jul 5th, 2025

पुणे (साथीदार वृत्तसेवा) राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था तळेगाव दाभाडे पुणे येथे दिनांक २ ते ५ सप्टेंबर २०२१ दरम्यान सरपंच क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी ( यशदा ) पुणे आयोजित राष्ट्रिय ग्राम स्वराज्य अभियान ( RGSA ) २०२१-२२ अंतर्गत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये लातूर जिल्ह्यातील ५९ सरपंच सहभागी झाले होते. राज्यातील १०,००० नव निर्वाचित सरपंच यांना जिल्हानुसार हे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

या कार्यक्रमात ग्रामपंचायत प्रशासन व्यवस्थापन, ग्रामपंचायत १ ते ३३ कामकाज नमुने, विविध शासकिय योजनांची माहिती, ग्राम सभा आयोजन, लोक सहभागातून ग्राम विकास, ग्राम पंचायत विकासाची पंच सुत्री, ग्राम पंचायत कलम ४५ शाश्वत विकास ध्येय, मानव विकास आधारित GPDP ( ग्रामपंचायत आराखडा ), पाण्याचा ताळेबंद, सरपंचपदाचे दाईत्व, E Tendering प्रक्रिया, लेखा संहिता, ग्रामपंचायत निधीसंकलन, योग प्रशिक्षण अशा विविध विषयांवर सरपंचांना मार्गदर्शन करण्यात आले. आत्मनिर्भर ग्राम अभियानविषयी या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्याचा अनुभव खूप चांगला होता.

या दरम्यान महाएनजीओ फेडरेशन कार्याचे पुस्तक यशदाचे उपसंचालक बी एल वराळे यांना भेट म्हणून देण्यात आले. राज्यातील अनेक प्रवीण प्रशिक्षक या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रम सत्र समन्वयक म्हणून नीता मगर, श्री गंगागिरी गिरी, प्रभाकर बिरादार, विजय वरूडकर यांनी नियोजन केले होते.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.