• Sat. Jul 5th, 2025

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांचे आवाहन नंदुरबार – (साथीदार वृत्तसेवा) राज्य शासनाने जाहीर केल्यानुसार संचारबंदीचा कालावधी ३१ मे पर्यंत वाढविण्यात आलेला असून कोविड-१९ च्या संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी  ‘रमजान ईद’ हा सण सर्वांनी आपल्या घरीच साजरा करावा’ असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड  यांनी केले आहे.
जिल्ह्यात कोविडचा प्रभाव वाढू नये यासाठी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व धार्मिक स्थळे तसेच इतर सर्व प्रार्थना स्थळे भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार असून सर्व धार्मिक सभा, परिषदा आयोजित करण्यावरदेखील बंदी आहे. त्यानुसार आदेश निर्गमित आले आहेत.  या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व मुस्लिम बांधवांनी  आज, २५ मे रोजी साजरा करण्यात येणारा ‘रमजान ईद’ हा सण आपल्या घरीच साजरा करावा. यावेळी सोशल डिस्टसिंग पाळावे. प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा समाजमाध्यमे अथवा दूरध्वनी-भ्रमणध्वनीद्वारे  शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी केले आहे.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.