महाराष्ट्र सायबरतर्फे अत्यंत महत्त्वाचा खुलासा; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) गेल्या दोन दिवसांपासून
‘140 या अंकाने सुरुवात होणाऱ्या अनोळखी क्रमांकावरून आलेला फोन कॉल रिसीव केला तर आपल्या खात्यातील सर्व पैसे काढले जाऊन अकाउंट शून्य होते’ असे जे संदेश समाज माध्यमावर फिरत आहेत. त्या संदेशामध्ये कोणतेही तथ्य नसून जोपर्यंत आपण, बँक अकाउंट डिटेल्स, ओटीपी अथवा क्रेडिट कार्ड / डेबिट कार्डचे पूर्ण नंबर तसेच सी. व्ही. व्ही./ पिन नंबर शेअर करीत नाही तोपर्यंत आपल्या बँक खात्याला कसलेही नुकसान होऊ शकत नाही हे लक्षात घ्यावे.

जर आपणास 140 ने सुरुवात होणाऱ्या क्रमांकावरून फोन कॉल आला तर घाबरु नये / पॅनिक होऊ नये. हे क्रमांक टेलिमार्केटिंग करिता दिले गेलेले असतात. परंतु, हेदेखील लक्षात ठेवावे की, अशा किंवा इतर कोणत्याही क्रमांकावरून फोन कॉल आल्यास व ओटीपीसह आपली वैयक्तिक माहिती, बँक डिटेल्स, डेबिट / क्रेडिट कार्ड डिटेल्स जर कोणी विचारत असेल तर आपण आपली कोणतीही वैयक्तिक माहिती, बँक खात्याची माहिती, डेबिट / क्रेडिट कार्डची माहिती अथवा पिन नंबर / ओटीपी देऊ नये अथवा दिला जाणार नाही याची काळजी घ्यावी, अशी माहिती महाराष्ट्र सायबर अर्थातच राज्य सरकारच्या अधिकृत सायबर सुरक्षेसाठी कार्यरत टीमच्या ट्विटर अकाउंटवर विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या नावाने प्रसिद्ध झाली आहे.
याबाबत सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण महाराष्ट्र सायबर अकाऊंटवरील ट्विट या लिंकवर क्लिक करून माहिती घेऊ शकता.