• Sat. Jul 5th, 2025

जाणून घ्या, १४० पासून सुरू होणाऱ्या नंबरच्या कॉलची सत्यता

महाराष्ट्र सायबरतर्फे अत्यंत महत्त्वाचा खुलासा; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) गेल्या दोन दिवसांपासून
‘140 या अंकाने सुरुवात होणाऱ्या अनोळखी क्रमांकावरून आलेला फोन कॉल रिसीव केला तर  आपल्या खात्यातील सर्व पैसे  काढले जाऊन अकाउंट शून्य होते’ असे जे संदेश समाज माध्यमावर  फिरत आहेत. त्या संदेशामध्ये कोणतेही तथ्य नसून  जोपर्यंत आपण, बँक अकाउंट डिटेल्स, ओटीपी अथवा क्रेडिट कार्ड / डेबिट कार्डचे पूर्ण नंबर तसेच  सी. व्ही. व्ही./ पिन नंबर  शेअर करीत नाही तोपर्यंत आपल्या बँक खात्याला कसलेही नुकसान होऊ शकत नाही हे लक्षात घ्यावे.

जर आपणास 140 ने सुरुवात होणाऱ्या क्रमांकावरून फोन कॉल आला तर घाबरु नये / पॅनिक होऊ नये. हे क्रमांक टेलिमार्केटिंग करिता दिले गेलेले असतात. परंतु, हेदेखील लक्षात ठेवावे की, अशा किंवा इतर कोणत्याही क्रमांकावरून फोन कॉल आल्यास व ओटीपीसह आपली वैयक्तिक माहिती,  बँक डिटेल्स, डेबिट / क्रेडिट  कार्ड डिटेल्स जर कोणी विचारत असेल तर आपण आपली कोणतीही वैयक्तिक माहिती, बँक खात्याची माहिती, डेबिट / क्रेडिट कार्डची माहिती अथवा पिन नंबर / ओटीपी देऊ नये अथवा दिला जाणार नाही याची काळजी घ्यावी, अशी माहिती महाराष्ट्र सायबर अर्थातच राज्य सरकारच्या अधिकृत सायबर सुरक्षेसाठी कार्यरत टीमच्या ट्विटर अकाउंटवर विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या नावाने प्रसिद्ध झाली आहे.

याबाबत सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण महाराष्ट्र सायबर अकाऊंटवरील ट्विट या लिंकवर क्लिक करून माहिती घेऊ शकता.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.