• Sat. Jul 5th, 2025

जळगांव (साथीदार वृत्तसेवा)

जिल्ह्यात विकासात्मक कामे लवकर पूर्ण करून नागरिकांना प्रत्येक योजनेचा तत्काळ लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी दिले.

जिल्ह्याची “जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा)” बैठक नुकतीच जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी रक्षाताई खडसे बोलत होत्या.

बैठकीत प्रधानमंत्री पिक विमा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मध्यान्ह पोषण आहार योजना, राष्ट्रीय ग्रामीण पाणीपुरवठा योजना, अमृत योजना, रोजगार हमी, दीनदयाल विद्युतीकरण योजना, मूलभूत सुविधा प्रकल्प, डिजिटल इंडिया योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, स्वच्छ भारत योजना, उज्वल अशुरंस योजना, सर्वशिक्षा योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन, राष्ट्रीय भूमी अभिलेख यासारख्या विविध केंद्र सरकार पुरुस्कुत योजनांसह दूरसंचार, महामार्ग, रेल्वे, खनिकर्म यासारख्या विविध महत्वपूर्ण विषयांवर चर्चा होऊन जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला.

यावेळी खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांच्यासह आमदार संजयजी सावकारे, आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, ॲड.एसपी नखाते, मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, डीएफओ जमीर शेख व सर्व विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Minister of state rakshataai khadse

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.